कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मोठे धक्के बसत आहेत.समरजित घाटगे,राहुल देसाई यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी ही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
महायुतीला बसणारे हे धक्के बदलत्या राजकीय घटनांचे बदलाचे मोठे संकेत मानले जातात. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजिनामा. दिला आहे.त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे.नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरूध्द त्या नी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.दरम्यान आजच दुपारी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी पदाचा राजिनामा दिला तर आता ए.वाय.पाटील यांनी राजिनामा देउन राष्ट्रवादी अजित पवार पक्षास मोठे भगदाड पाडले आहे. ए.वाय.पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.