Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAdministrative52 दिवस लढतोय आणि जिंकणारच - खंडेराव जगदाळे

52 दिवस लढतोय आणि जिंकणारच – खंडेराव जगदाळे

राधानगरी( अरविंद पाटील ):- 12 जुलैला सभागृहात शिक्षण मंत्र्यांकडून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याची घोषणा केल्यानुसार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता तीन महिने होत आहेत तरी या घोषणेचा जीआर अद्याप पारित झालेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले आहे. हा निर्णय तात्काळ घ्यावा यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे कृती समितीमार्फत गेले 52 दिवस आंदोलन सुरू आहे. यामध्ये 11 दिवस शिक्षकांनी आमरण उपोषण सुद्धा केले होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना भेटून वारंवार शासनाकडे कृती समितीने पाठपुरावा केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलक शिक्षकांची संख्या जवळपास 67 हजार इतकी आहे.
आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी फोनवरून कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांना सांगितले होते की आपण आमरण उपोषण मागे घ्यावे टप्पा वाढीबाबत ची फाइल उद्या अर्थ विभागाकडे पाठवत आहे. त्यानंतर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ती येईल मी लवकरच आदेश काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, उपोषण सोडावे. मंत्री केसरकरांच्या विनंतीला मान देऊन फक्त ज्युस घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी त्यावेळी घेतला होता.अनेक दिवस कॅबिनेट लांबलेली आहे. सोमवार दिनांक 23 रोजी कॅबिनेट असल्याचे समजते. या बैठकीमध्ये शिक्षण मंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने हा विषय घेऊन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी या शिक्षकांनी केलेली आहे.
दरम्यान सोमवारच्या बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश काढण्याबाबत सरकारने विषय घेतला असल्याचे काही अशासकीय सूत्रांकडून समजते. तरीही या शिक्षकांनी सरकारला मंगळवार दिनांक 24 पर्यंत वाढीव टप्प्याचा शासन निर्णय काढण्यासाठी अल्टिमेटम दिला असून त्यास 48 तास उरलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जर धोका झाला तर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणारच आणि याला केवळ शासनच जबाबदार राहील असा ठाम निर्धारसुद्धा या शिक्षकांनी केलेला आहे. तसेच 52 दिवस या शिक्षकांनी मोठा संघर्ष केला असून लढणार आणि जिंकणारच असाही विश्वास व्यक्त केला आहे.
चौकट – मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी माझी वारंवार चर्चा झालेली आहे, कृती समिती व सर्व शिक्षक यांनी सत्तेवर असणारे काही आमदार, मंत्री , खासदार शिक्षण मंत्र्यांना संपर्क करून, भेटून अनेकदा विनंती केली आहे. या अनुषंगाने 23 तारखेला काय होणार याकडे राज्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या अनुषंगाने शासनाने शासन निर्णयामध्ये कोणताही शब्द न फिरवता, दिशाभूल न करता निर्णय घ्यावा.
– खंडेराव जगदाळे
यावेळी आंदोलन स्थळी जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे , केदारी मगदूम, वैद्यनाथ चाटे,मुरलीधर कवाडकर, ,प्रताप देशमुख, नारायण गायकवाड अरविंद पाटील, संदीप कांबळे युवराज पाटील जनार्धन दिंडे , राजू भोरे हेमंत धनवडे,शिवाजी घाटगे अनिल देसाई नेहा भुसारी गौतमी पाटील, मुक्ता मोटे भाग्यश्री राणे,रेश्मा सनदी हेमा पोळ यांचेसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News