सोळांकूर/प्रतिनिधी: राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डांगोरा पिटत आहेत मात्र दर्जाहीन सुमार रस्त्यांची कामे, निकृष्ट बांधकामे, बेरोजगारी, औद्योगिकीकरण यासह अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत.दूधगंगा कालव्याचे अस्तरीकरण उखडले तर धरणाच्या गळती साठी तीन चार टेंडर झाली मात्र पसंतीचा काँन्ट्रक्टर मिळाला नसल्याने काम रेंगाळले आहे हा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राधानगरी विधानसभेच्या मैदानात उतरणारच अशी घोषणा ए वाय पाटील यांनी करुन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.




