कसबा बावडा: देव तारी त्याला कोण मारी अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग उलपे यांना चक्क एका स्पीड ब्रेकर मुळेच पुनर्जन्म मिळाला आहे. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 65 वर्षीय पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केलं. नातेवाईकांनी पांडुरंग तात्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले. याचवेळी कसबा बावडा परिसरात ॲम्बुलन्स एका स्पीड बेकरवर आदळली आणि याचा झटका लागून पांडुरंग तात्या यांच्या हातांची बोटे हळू लागली. आणि तात्यांना जणू जीवदानच मिळालं. कोल्हापूरमध्ये पांडुरंग उलपे यांची चर्चा होत आहे.
पांडुरंग उलपे हे वारकरी संप्रदायातील आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १६ डिसेंबर रोजी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू झाले, पण डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले नाही. डॉक्टरांनी पांडुरंग उलपे यांचं निधन झाल्याचे कुटुंबियांना कळवले. उलपे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि अॅम्ब्युलन्समधून तात्यांना घरी घेऊन निघाले. पण त्याचवेळी कसबा बावडा येथेच रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. तेथूनच रुग्णवाहिका रुग्णालयाकडे पुन्हा माघारी फिरली.रुग्णवाहिका पुन्हा एकदा रुग्णालयाकडे वळवली. त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. १५ दिवसानंतर पांडुरंग उलपे स्वतःच्या पायावर उभे राहिलेत.