Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeपानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाचा दिलासा

पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाचा दिलासा

मुंबई-  कम्युनिस्ट पक्षाचे नेते  गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना  दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे आणि वासुदेव सूर्यवंशी या सहाजणांना न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने जामीन मंजूर केला, तर डॉ. वीरेंद्र तावडे याची जामीन याचिका नंतर दाखल झाल्याने न्यायालय त्यावर आता स्वतंत्र सुनावणी घेणार आहे. 2015  मध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली.  या प्रकरणात आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही आरोपीच्या याचिकेत म्हटले होते. 

कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची 16  फेब्रुवारी 2015  रोजी  गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर, राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली.  दुसरीकडे,  कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा खुलासा होईपर्यंत या प्रकरणातील तपासात कोणतेही यश येत नव्हते.  कर्नाटक एटीएसने महाराष्ट्रात येऊन गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे समोर आले.

न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या सहा आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. 2018 ते 2019  दरम्यान या सर्वांना वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून हे सर्वजण तुरुंगात आहेत. सहा आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागल्याने मी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत आहे. तसेच  दुसरे आरोपी वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी  करणार असल्याचे न्या. किलोर यांनी स्पष्ट केले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News