जालन्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. पुलाचं काम करणारे कामगार पत्र्याखाली झोपलेले असतानाच टिप्पर चालकानं वाळू टाकून दिल्यानं 5 कामागारांचा दबून मृत्यू झालाय. वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले 5 कामगार जागीच ठार झालेत. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रस्त्यावर ही घटना घडली आहे. पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्यानं झोपलेल्या 5 मजुरांना काहीच करता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात ही घटना घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुल बांधण्याचं काम चालू आहे. या कामासाठी सिल्लोडमधील काही मजूर आले आहेत. काल दिवसभर पुलाचं काम करून रात्री 5 कामगारांनी विसावा घेण्यासाठी पासोडी-चांडोळ रस्त्याजवळ पत्र्याचं शेड बांधलं.



