गृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस कसे थांबले? माणसं आहे की कोण आहे? असं म्हणत धनंजय देशमुख यांनी गृहविभागावर सवाल उपस्थित केला. “सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, आरोपी कोण आहे, यांना कोण सांभाळत होतं, यांनी सगळं आयुष्यच सगळे डील करत काढलं. या संपूर्ण प्रकरणात 150 लोक आहेत. गृहमंत्रालयाच्या नाकावर टीच्चून आरोपी क्रमांक एक हजर झाला” अशा संतप्त भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या. नीच लोकांनी याचं समर्थन केलं, मोर्चे काढले, आंदोलन केले. यांना कधीच वाटलं नाही असं धनंजय देशमुख म्हणाले.
ADVERTISEMENT
सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं, तरी माझ्या भावांना मारणाऱ्यांना मारलं तरच आम्ही त्यांच्याबद्दल बोलू, अन्यथा बोलणार नाही. आज आम्ही मरणाच्या दारात आल्यावर तुम्ही राजीनामा घेता का? असा सवाल संतोष देशमुख यांनी केला. मोठी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करावा आणि आम्हाला सांगावं. आमच्या नाकावर टीच्चून सांगा, की आमच्या गावातला एकही माणूस सोडणार नाही असा संताप धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.



