कोल्हापूर – गगनबावडा हायवे वर बलिंगा येथे उड्डाणपूलाचे काम चालू आहे. बालिंगा आणि आसपासचा परिसर हा महापूरग्रस्त आहे त्यामुळे या महामार्गावर उड्डाणपूल करत असताना महापुराचा धोका वाढू नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावा या बैठकीत घेण्यात आली. तसेच संभाव्य उड्डाणपूल हा पिलरचा व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्याचा देखील विचार करून नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा अशी चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे , कुंभीचे व्हा.चेअरमन राहुल खाडे,माजी जिप सदस्य बाबासाहेब देवकर, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळ चे संचालक बाळासाहेब खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.