Sunday, May 24, 2026
HomePoliticalयेवती गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून १.९५ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता...

येवती गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून १.९५ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता – आमदार चंद्रदीप नरके

येवती:

करवीर तालुक्यातील मौजे येवती येथील नळ पाणीपुरवठा योजनेला जल जीवन मिशन अंतर्गत शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, यासाठी तब्बल ₹१ कोटी ९५ लाखांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

गावातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या मूळ आराखड्यात काही तांत्रिक बदल आवश्यक ठरल्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू होती. अखेर राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिनांक १२ मे २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करत या सुधारित खर्चास मंजुरी दिली.

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान आवश्यक तांत्रिक निकष पूर्ण करून कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर तिचे देखभाल व संचालन स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करून शासन दरबारी विषय प्रभावीपणे मांडल्यामुळेच मंजुरी प्रक्रियेला गती मिळाली, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular